राज्यातील शेतकरी,वांचीताना न्याय देण्याचे सामर्थ दे : मुख्यमंत्री  फडणवीस

राज्यातील शेतकरी,वांचीताना न्याय देण्याचे सामर्थ दे : मुख्यमंत्री फडणवीस

श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न,बुलडाण्याचे मेरत दाम्पत्यांना मान

मंदार लोहोकरे, पंढरपूर :- राज्यातील शेतकरी,वंचिताना न्याय देण्याचे सामर्थ  दे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल आणि रूक्मीणी यांची शासकीय महापूजा केली. त्यानंतर विठ्ठल मंदीराच्या सभागृहात मानाचे वारकरी दांपत्य परसराम उत्तमराव मेरत आणि सौ. अनुसया परसराम मेरत यांचा सत्कार करण्यात आला.  मेरत (वय 54 वर्षे) आणि  मेरत (वय 45 वर्षे) रा. बाळसमुद्र ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हणून शासकीय महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

 

महापूजा झाल्या नंतर श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि , मागील वर्षी मी, श्री विठ्ठलाच्या चरणी भरभरून पाऊस पाडण्याचे साकडे घातले होते. गेल्यावर्षी श्री विठ्ठलाच्या कृपेने राज्यभरात भरभरून पाऊस पडला. शेतक-याचे उत्पादनही भरभरून आले. राज्य शासनाने नुकताच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला सहाय्य देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाला बळ द्यावे. गोर गरीब,शेतकरी आणि वंचिताना न्याय देण्याचे सामर्थ दे असे साकडे विठ्ठल चरणी केली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी परसराम मेरत यांचा तर अमृता फडणवीस यांच्या हस्ते  अनुसया मेरत यांचा सत्कार करण्यात आला. पंधरा हजार रूपयाचा धनादेश, वर्षभर प्रवासासाठी एसटीचा पास त्यांना देण्यात आला.

 

या वेळी  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला तर  दिपाली भोसले यांनी अमृता फडणवीस यांचा सत्कार केला. मंदीर समितीचे नूतन अध्यक्ष अतुल भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राज्यमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्षा  साधना भोसले, आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

वारकरी संघटनेशी चर्चा करू : मुख्यमंत्री 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आणि अध्यक्षाची नियुक्ती राज्य सरकारने केली. या समितीचे अध्यक्षपदी वारकरी सांप्रदायातील व्यक्ती असावा अशी मागणी महाराज मंडळीनी केली. सोमवारी सायंकाळी माउलीची पालखी पंढरपुरात येत असताना महराज मंडळीनी ठिय्या आंदोलन करीत समिती बरखास्त करा अशी मागणी केली. दीड तासा नंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले कि, विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतील काही सदस्यपदे रिक्त आहेत. या पदावरील नियुक्ती करताना वारकरी संघटनांशी चर्चा करूनच केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विठुरायाच्या मदतीसाठी कॅनडाची मदत : मुख्यमंत्री 

पंढरपूरच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहेत. त्याच बरोबरीने नुकतेच कॅनडाची एक शिष्टमंडळाने भेट दिली. कॅनडा सरकारला १५ वर्ष पूर्ण झाली.त्या निमित्त सांस्कृतिक विभाग राज्याच्या विकासासाठी मदत व निधी देण्यास इच्छुक आहेत. या चर्चेत पंढरपूरच्या विकासाला मदत देण्याचे कॅनडाच्या शिष्टमंडळ तयार झाले असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले .

 

 

COMMENTS