सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी –  राजू शेट्टी

सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी – राजू शेट्टी

पुणे – सदाभाऊ खोत यांच्याबद्‌दल अनेक तक्रारी आल्यामुळे त्यांची हकालपट्टी होणार किंवा नाही, याचा निर्णय 4 जुलैपर्यंत होऊ शकते. ‘सदाभाऊ खोत यांच्याबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामुळे या तक्रारींबाबत सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी’, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘स्वाभिमानी’चे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी आज  पुण्यातील पत्रकार परिषदेत या संदर्भात भाष्य केले.

“पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीसमोर 4 जुलैपर्यंत सदाभाऊंनी आपली बाजू मांडावी. त्यानंतर सदाभाऊंबाबत निर्णय घेतला जाईल.”, असे राजू शेट्टी म्हणाले.

COMMENTS