सरसंघचालकांना ध्वजारोहणापासून रोखणे जिल्हाधिकाऱ्याला पडले महागात !

सरसंघचालकांना ध्वजारोहणापासून रोखणे जिल्हाधिकाऱ्याला पडले महागात !

तिरुअनंतपूरम – केरळमधील पल्लकडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ध्वजारोहणापासून रोखल्या प्रकरणी त्यांची बदली करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी राजकीय व्यक्ती शाळेतील ध्वजारोहण करु शकत नाही, असे म्हटले होते.

पण मोहन भागवतांना 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी स्वत: शाळेनेच आमंत्रित केल्यामुळे मोहन भागवतांनी वादानंतरही ध्वजारोहण केले होते. दरम्यान, मोहन भागवत यांनी झेंडा फडकल्यानंतर मेरीकुथी यांनी सरकारला अहवाल सादर केला होता. त्या अहवालात मोहन भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यांनी पोलिसांना तसे आदेशही दिले होते. जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांची या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर बदली झाल्याने, तर्क-वितर्क लढवणे साहजिकच आहे. पण ही बदली नियमित असल्याचा केरळ सरकारचा दावा आहे. केवळ मेरीकुथी यांचीच नव्हे तर अन्य चार जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाल्याचे केरळ सरकारने म्हटले आहे. मेरीकुथी यांच्या जागी सुरेश बाबू यांची पल्लकडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

COMMENTS