साले म्हणणारे शेतकऱ्यांना काय न्याय देणार-  अशोक चव्हाण 

साले म्हणणारे शेतकऱ्यांना काय न्याय देणार-  अशोक चव्हाण 

पुणे – ‘शेतकऱ्यांना साले म्हणणारे शेतकऱ्यांना काय न्याय देणार?’ असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. ते काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.

नागपूर अधिवेशनादरम्यान 13 डिसेंबरला काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढून सरकारला जाब विचारणार आहोत, अशी घोषणा ही केली.  यावेळी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

सत्तेत येऊन तीन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱयांना आजही आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱयांच्या छातीत गोळी मारण्यापेक्षा पायावर गोळी मारता आला असती, अशी भाषा करणारे हे सरकार शेतकऱयाला काय न्याय देणार, असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

 

शेवगाव तालुक्मयातील घोटण व खानापूर परिसरात ऊसदर वाढीसाठी शेतकऱयांनी आंदोलन व रास्तारोको केले. यावेळी आंदोलक शेतकऱयांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन शेतकरी जखमी होते. याबाबत चव्हाण यांना विचारले ते म्हणाले, ही घटना निषेधार्ह आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱयांवर गोळीबार करणे, ही दडपशाही आहे. त्यात भाजपा नेते ‘छातीऐवजी पायावर गोळी मारता आली असती,’ असे वक्तव्य करीत असतील, तर त्यातून हे सरकार कुठे चाललेय, हे स्पष्ट होते. शेतकऱयांना अशा पद्धतीने गोळय़ा घालणारे हे सरकार त्यांना काय न्याय देणार? असेही चव्हाण म्हणाले.

 

COMMENTS