स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली एसटी बस !

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली एसटी बस !

उस्मानाबाद – आजपर्यत एसटी बस न पाहिलेल्या  परंडा तालुक्यातील घारगावात चक्क आज एसटी बस सेवा सुरु झाली आहे.  काहीच दिवसांपूर्वी परंडा शिवसेना उपतालुका प्रमुख डॅां. प्रशांत मांजरे पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते  यांना याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर माहिनाभरातच  या गावात एसटी बस चालू झाली आहे. परंडा ते घारगाव अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात पहिल्यांदा या गावांना एसटी बस आली आणि गावकऱ्यांनी जल्लोषात तिचे स्वागत केले. येथील मुलींना शिक्षणासाठी सात- आठ किलोमीटर सायकलवर जावे लागत होते त्यांची आता मोठी सोय होणार आहे.

COMMENTS