हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान

हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान

मुंबई – शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर जोरदार प्रहार केला. भाजपचे नेते अधूनमधून मध्यावधी निवडणुकीच्या पुड्या सोडतात, खरंच त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मध्यावधी निवडणूका घेऊन दाखव्यात असं आव्हान उद्धव यांनी भाजपला दिलं. भाजपनं मध्यावधी निवडणुक लादलीच तर शिवसैनिक वणव्यासारखा पेटून उठेल आणि महाराष्टाच्या मातीत तुम्हाला गाडेल अशा शब्दात त्यांनी भाजपला फटकारलं. आपणच सारखं जिंकतो हे विसरा, आता परिस्थिती बदली आहे. शेतकरी पेटला आहे आणि तो तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव म्हणाले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावरुनही उद्धव यांनी भाजपवर टीका केली. केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी दलित उमेदवार दिला असल्याचा आरोप उद्धव यांनी केला.

COMMENTS