15 दिवसात मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन फेरीवालेमुक्त करा नाहीतर………, राज ठाकरेंचा सज्जड इशारा

15 दिवसात मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन फेरीवालेमुक्त करा नाहीतर………, राज ठाकरेंचा सज्जड इशारा

मंबई – मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन आणि फूटओव्हर ब्रिज येत्या 15 दिवसात फेरीवालेमुक्त करा नाहीतर 16 व्या दिवशी मनसे ते काम करेल असा सज्जड इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत आज मनसेतर्फे संताप मोर्चा काढण्यात आला. एलफिन्स्टन स्टेशनव झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ हा संताप मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मोठा प्रतिसाद मिळाला.

राज ठाकरे यांनी यावेळी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. केवळ काही मुठभर गुजराथी लोकांसाठी 1 लाख 10 हजार कोटी रुपये मोजून देशावर कर्ज केले जात असल्याचा घणाघाती आरोप राज यांनी केला. काही गुजराथी लोकांसाठी केलेले कर्ज देशाने काय फेडायचे असा सवाल करत मोदी यांची विरोधात असताना बुलेट ट्रेनबाबत काय भूमिका होती असा सवालही राज यांनी केला.  सुरेश प्रभू यांनी बुलेट ट्रेनला विरोध केल्यामुळेच त्यांना रेल्वे मंत्रीपदावरुन काढल्याची टीकाही राज यांनी केली.

एवढा खोटा बोलणारा पंतप्रान मी कधीच पाहिला नाही असा टोलाही राज यांनी मारला.  मोदी सराकरारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करावा असं आवाहनही राज यांनी पत्रकार, संपादक, उद्योजक आणि न्यायमूर्तींना केलं.

COMMENTS