70 वर्षात आयएसआयला जमलं नाही, ते मोदी सरकारने 3 वर्षात करुन दाखवलं – अरविंद केजरीवाल

70 वर्षात आयएसआयला जमलं नाही, ते मोदी सरकारने 3 वर्षात करुन दाखवलं – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली – देश तोडण्याचे जे काम आयएसआयला 70 वर्षांत करता आले नाही ते काम भाजपने तीन वर्षांत केले, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद कंजरीवाल यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

‘आप’च्या पाचव्या स्थापना वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशभरातून कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आले हाते. यावेळी बोलतान केजरीवाल म्हणाले, “ देश नाजूक स्थतीतून जात आहे, दुसरीकडे हिंदू-मुसलमान यांना आपांपसात लढवून देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू-मुसलमानांच्या नावावर भारताची फाळणी करण्याचे पाकिस्तानचे पूर्वीपासूनचे स्वप्न आहे, जे लोग देशातील हिंदू-मुसलमानांमध्ये फूट पाडत आहेत, ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे ‘एजंट’आहेत. ते राष्ट्रभक्तीचा वेश परिधान केलेले देशद्रोही आहेत. देश तोडण्याचे जे काम आयएसआयला 70 वर्षांत करता आले नाही ते काम भाजपाने तीन वर्षांत केले.’ तसेच भाजप सांप्रदायिकतेचे राजकारण करत पाकिस्तानचे हित साधत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केला.

 

COMMENTS