“मोदींच्या हत्येचा कट आरएसएस आणि गडकरींनी रचला”

“मोदींच्या हत्येचा कट आरएसएस आणि गडकरींनी रचला”

नवी दिल्ली – पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट राष्ट्रीय स्वंयंसेवक संघ आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रचल्याचा खळबळजनक आरोप जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष शैहला रशीद यांनी केला आहे. कटाचं खापर मात्र मुस्लिम आणि नक्षलवाद्यांवर फोडलं जात असल्याचा आरोपही शैहला रशीद यांनी केला आहे. ट्विट करुन रशीद यांनी हा आरोप केला आहे.

रशीद यांच्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यामुळे प्रचंड संतापले आहेत. या प्रकरणात आपण रशीद यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट नक्षलवाद्यांनी रचला असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी पुणे न्यायालयात केला होता. एल्गार परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर त्यावेळी युक्तीवाद करताना सरकारी वकीलांनी न्यायालयात मोदींच्या हत्येचा  कट रचल्याचा माहिती कोर्टाला दिली होती. त्यावर रशीद यांनी हा पलटवार केला आहे.

COMMENTS