अजित पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’ !

अजित पवारांचा सरकारवर ‘हल्लाबोल’ !

उस्मानाबाद – लबाड लांडगा ढोंग करतय, जनतेला फसविण्याचे काम करतय असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारवर जोरदार हल्ला केला आहे. मंगळवारी तुळजापूरमध्ये सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ करुन राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारकडून वारंवार विविध आश्वासनं दिली जात आहेत. परंतु यातील अनेक आश्वासनं खोटी ठरली आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी भाजपला गाजर तर शिवसेना मुळ्याची उपमा देऊन खिल्ली उडविली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली आहे. स्वतःला शेतकऱ्यांचा कैवारी समजणारा सदाभाऊ खोत मूग गिळून गप्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लेडीज क्लब मैदानावरून निघालेल्या मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते डॉ.. पद्मसिंह पाटील, दिलीप वळसेपाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार चित्रा वाघ, विद्याताई चव्हाण, आदी उपस्थित होते.

 

 

COMMENTS