रायबरेलीत फक्त परिवारवाद, विकास मात्र शून्य – अमित शाह

रायबरेलीत फक्त परिवारवाद, विकास मात्र शून्य – अमित शाह

रायबरेली- रायबरेली जिल्ह्यात फक्त परिवारवाद पाहिला असून याठिकाणी विकास मात्र शून्य असल्याची जोरदार टीका भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये अमित शहा यांनी शनिवारी रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच काँग्रेसच्या मक्का मशिद प्रकरणी तुम्ही केलेल्या कामावर पाणी फेरलं आहे. त्यामुळे तुम्हाला लोकांची माफी मागायला हवी, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.

दरम्यान ‘काँग्रेसला हिंदू दहशतवादाचं खोटं पसरविण्यासाठी माफी मागायला हवी की नाही? असंही अमित शहा यांनी त्यांच्या शैलीत विचारलं आहे. 4 दिवस उलटूनही वोटबँकेच्या राजकारणासाठी ते माफी मागत नसून रायबरेलीला परिवारवादापासून मुक्त करणार असून या अभियानाची आजपासून सुरु केली असल्याचंही अमित शाह यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS