पूर्वी राज ठाकरेंच्या भाषणावर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, आता शरद पवारांचा दिसतोय – आशिष शेलार

पूर्वी राज ठाकरेंच्या भाषणावर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, आता शरद पवारांचा दिसतोय – आशिष शेलार

मुंबई – भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शेलार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं असून याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा परंतु हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येत असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. तर ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने रोजगारमुक्त केलं त्यांनी मोदीमुक्त भारताची मुक्ताफळे उधळली आहेत अशी टीकाही त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान मोदीमुक्त भारत हे जरा जास्तच झालं असून आपला स्तर पाहून बोलावे, विधानसभा मनसेमुक्त झालं, मुंबई महापालिकेतले उरले सुरले नगरसेवक पळून गेले. ज्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने रोजगार मुक्त केलं त्यांच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही असंही शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच मराठी पाट्या लागल्या पाहिजेत असा कायदा आहे. मात्र पालिका कारवाई करत नाही आणि दुसरीकडे आंदोलन सुरू आहे याचा राजकीय अर्थ काय? असा सवालही शेलार यांनी केला आहे.

 

 

COMMENTS