मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – चव्हाण

मुंबई – भीमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.शनिवारी टिळक भवन दादर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचं अपयश आहे अशीच सर्वांची भावना आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झाला आहे. सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जातीय तणाव निर्माण करणा-यांवर सरकार कारवाई का करीत नाही?  त्यांना अटक का केली जात नाही ?  सरकारच्या मुकसंमतीने जाणीवपूर्वक हे सुरु आहे, असा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेणार असून काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधीच्या काही सभा महाराष्ट्रात झाल्या पाहीजेत अशी नेत्यांची इच्छा आहे. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस राहुल गांधींना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती करणार आहे अशी माहिती खा. चव्हाण यांनी दिली.

COMMENTS