महाराष्ट्राला या सरकारच्या विळख्यातून सोडवण्याची गरज- अशोक चव्हाण

महाराष्ट्राला या सरकारच्या विळख्यातून सोडवण्याची गरज- अशोक चव्हाण

मुंबई – गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचा गौरव व्हावा असं कोणतही धोरण भाजप-शिवसेना सरकारने राबवलं नसल्याची जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त बोलत असताना अशोक चव्हाण यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान राज्यात कष्टकरी, श्रमजीवी, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून हे सरकार राज्याला अधोगतीकडे नेणारं असल्याची टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे  महाराष्ट्राला या सरकारच्या विळख्यातून सोडवण्याची गरज असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS