उद्धव ठाकरेंना ते लवकर कळलं याचा आनंद – खा. अशोक चव्हाण

उद्धव ठाकरेंना ते लवकर कळलं याचा आनंद – खा. अशोक चव्हाण

मुंबई –   भाजप हा बुडणारं जहाज आहे. बुडणा-या जहाजामध्ये आपण बुडून जाऊ नये म्हणून सर्व नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. भाजपला सोडण्याचा ज्यांनी निर्णय घेतला आहे त्यांचे निर्णय स्वागतार्ह आहेत. भाजप सरकार पुन्हा येणार नाही हे उध्दव ठाकरेंना लवकर कळलं याचा आनंद झाला असल्याचंही त्यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या सरकारने महाराष्ट्राच्या केलेल्या नुकसानीला शिवसेनाही तितकीच जबाबदार असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे. शिवसेनेने अगोदर सत्तेतून बाहेर पडाव आणि मगच बोलावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून आगामी निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजपची सत्ता येणार नाही हे उद्धव ठाकरेंना वेळेवर समजलं असून याबाबत आपल्याला आनंद झाला असल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS