“अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस !”

“अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस !”

मुंबई – यावर्षीचा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस असल्याची जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीचा कोणताही रोडमॅप नसून मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केलं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावर्षीचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांवर कराचा बोजा टाकणारा आणि महागाई वाढवणारा असल्यामुळे जनतेची घोर निराशा झाली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.

COMMENTS