मुंबईतील एक हजार रिक्षा चालक करणार राहुल गांधींचं स्वागत !

मुंबई – मुंबईतील 1 हजार रिक्षा चालक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं स्वागत करणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे. सामान्य माणसाला आपलं वाटणारा पक्ष म्हणजेच काँग्रेस पक्ष आणि त्यामुळेच सामान्य जनतेने अशाप्रकारे पार्टी अध्यक्षांचं स्वागत करायचं ठरवलं आहे, असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मंगळवारी (12 जून) राहुल गांधी मुंबईत येत असून ते  गोरेगाव एक्झिबिशन सेंटरमध्ये 15 हजार बूथस्तरीय कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. ग्राऊंड लेव्हलचे कार्यकर्ते आणि केंद्रीय नेतृत्वादरम्यान सुसंवाद व्हावा असा यामागचा उद्देश असल्याचा निरुपम यांनी म्हटलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूक जवळ आली असून त्याचीच ही मोर्चेबांधणी असल्याचीही माहिती आहे. दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असल्याचं दिसत असून काँग्रेसनंही मुंबईमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

COMMENTS