भाजप सरकार आंधळं आणि बहिरं, नाना पटोलेंचा सरकारलाच घरचा आहेर

भाजप सरकार आंधळं आणि बहिरं, नाना पटोलेंचा सरकारलाच घरचा आहेर

कोल्हापूर –  भाजप सरकार आंधळं आणि बहिरं आहे. सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो, पक्षाने काय कारवाई कारायची ती करू दे, असं म्हणत भाजप खासदार नाना पटोले यांनी सरकारला पुन्हा एकदा घरचा आहेर दिलाय.

शेतकरी आणि महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या सदाभाऊ खोत, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा, राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील? हे देखील समजत नाही, अशी टीकाही केली.

 

COMMENTS