भाजप सरकार म्हणजे नवसाचं पोर, पेकटात लाथा मारतंय पण सांगायचं कुणाला? – उद्धव ठाकरे

भाजप सरकार म्हणजे नवसाचं पोर, पेकटात लाथा मारतंय पण सांगायचं कुणाला? – उद्धव ठाकरे

कोल्हापूर –  आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांनी नवस करुन भाजप सरकार मागून घेतले. म्हणजेच भाजप सरकार नवसाचं पोर आहे. मात्र हे पोर मोठं होऊ आपल्याच पेकटात लाथा मारत असेल तर सांगायचं कुणाला?, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. 

 

सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी यासर्वांच्या हिताकरता चांगले काम करावे म्हणून आपण भाजपसोबत गेलो होतो. सत्तेत असूनही सरकारविरोधात बोलत असल्याने सेनेवर टीका होते. मात्र, चुकीच्या गोष्टींवर आपण गप्प बसणार नसल्याचे उद्धव म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील उद्योजक रस्त्यावर उतरणार असतील, तर आपण त्यांचं नेतृत्व करायला तयार आहोत, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र हे शिवरायांचे राज्य आहे. त्यामुळे कण्हत बसण्यापेक्षा राज्यातील व्यापारी, शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन लढण्याची तयारी करावी असे उद्धव म्हणाले.

COMMENTS