भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, “त्यामुळेच मुस्लिम जास्त मुलं जन्माला घालतात !”

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, “त्यामुळेच मुस्लिम जास्त मुलं जन्माला घालतात !”

राजस्थान – भाजपचे आमदार बनवारीलाल सिंघल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशात स्वत:ची लोकसंख्या वाढवून भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचं असल्यामुळेच मुस्लिम जोडपी डझनभर मुलं जन्माला घालतात असं सिंघल यांनी म्हटलं आहे. ते राजनस्थानमधील  अलवार मतदार संघाचे आमदार आहेत. एवढेच नाही तर एखाद्या जोडप्याला जास्त मुलांना जन्म देता येणे शक्य नसेल तर मुस्लिम पुरूष दुसरं लग्न करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी मग बिहार आणि पश्चिम बंगालमधून मुली विकत घ्याव्या लागल्या, तर मुस्लिम पुरूष तेदेखील करतात असंही ते म्हणाले आहेत.

त्यावेळी त्यांनी हिंदू स्वाभिमान संघटनेचे समन्वयक नरसिंह नंद सरस्वती यांच्या विधानाचीही आठवण करुन दिली. हिंदू लोक हे आपल्या मुलांचे शिक्षण आणि संगोपन चांगल्या पद्धतीने व्हावे, याकडे लक्ष देतात. तर मुस्लिम लोक केवळ जास्तीत जास्त मुले जन्माला घालून लोकसंख्या कशी वाढवता येईल, याचा विचार करतात. त्यांना शिक्षण आणि विकासाशी काहीही देणेघेणे नसतं हे विचार मला यति नरसिंह नंद सरस्वती यांचे पटतात म्हणूनच मी असं वक्तव्य केलं असल्याचं ते म्हणालेत.  दरम्यान राजस्थानमधील अलवार आणि अजमेर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहेत. या पार्शभूमीवरच त्यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

COMMENTS