राजीव गांधींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला –भाजप खासदार

राजीव गांधींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला –भाजप खासदार

मुंबई – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केलं असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी घेतला असून राजीव गांधी यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असेल, याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी थेट सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला होता असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नलिनीला मृत्यूदंड ठोठावला होता. गांधी कुटुंबानं राष्ट्रपतींना पत्र लिहून तिला आजीवन कारावास देण्याची मागणी केली. त्यांनंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण कुटुंबावर संशय येत आहे. तसेच जेव्हा सर्वोच्च न्यायालय यावर विचार करत असेल आणि भारत सरकारने सक्त भूमिका घेतली असेल नेमके त्याचवेळी असे वक्तव्य करणे याचाच अर्थ त्यांचा एलटीटीईशी काही संबंध असू शकतो. असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS