मोदींकडे कोणी बोट केलं तर त्याचा हात कापू, बिहार भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आक्षेपार्ह विधान !

मोदींकडे कोणी बोट केलं तर त्याचा हात कापू, बिहार भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आक्षेपार्ह विधान !

पाटणा – भाजपमध्ये आक्षेपार्हय बोलणा-यांची काही कमी नाही. काही दिवसांपूर्वी पंडित नेहरु यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त ट्विट पक्षाच्या आयटी सेल प्रमुखांनी केले होते. त्यानंतर आता तेवढचे आक्षेपार्ह ट्विट बिहार भाजपचे अध्यक्ष नित्यानंद राय यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी हे गरीबीतून पुढे आले आहेत. ते स्वकर्तुत्वावर आणि कष्टाने पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कोणाचेही मतभेद असले तरी त्यांच्या गुणांची प्रत्येकाने कदर करायला हवी. जर कोणी त्यांच्याकडे बोट दाखवत असले तर त्यांचा हात कापू असा इशारा बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी दिला आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर राय यांना उपरती आली आहे. आपण म्हण म्हणून या वक्तव्याचा वापर केला होता. त्या वक्तव्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि ते वक्तव्य मागे घेतो असंही राय यांनी म्हटलं आहे.

COMMENTS