आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका – मुख्यमंत्री

आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारणासाठी तात्काळ पाऊले उचलण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. संपूर्ण राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. अशा परिस्थितीत आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.आज मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांतील दुष्काळाची परिस्थिती आणि झालेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच दुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे राज्यातील शेतकय्रांना दिलासा मिळाला आहे. परंतु त्यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS