मोदींच्या ‘मन की बात’नंतर मुख्यमंत्र्यांचा आता ‘दिल से’ कार्यक्रम !

मोदींच्या ‘मन की बात’नंतर मुख्यमंत्र्यांचा आता ‘दिल से’ कार्यक्रम !

मध्य प्रदेश – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात, चाय पे चर्चा, परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आता आकाशवाणी आणि दुरदर्शवनवर दिल से हा कार्यक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम आजपासून सुरु होणार असल्याचं शिवराज सिंह यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाद्वारे ते राज्यातील जनतेशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

https://twitter.com/CMMadhyaPradesh/status/962324064399323136

दरम्यान आज सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित होणार आहे. आजच्या या कार्यक्रमात ते सामाजिक सांस्कृतिक मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे मध्ये प्रदेशातील जनता शिवराज सिंह चौहान यांच्या या कार्यक्रमाला कीतपत प्रतिसाद देते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS