आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही – मुख्यमंत्री

आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांची नावं बीएमसीने पाणीपट्टी भरली नसल्याने डिफॉल्टर यादीत टाकण्यावरुन अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यांचं पाणी तोडून टाका… बिना आंघोळीचं त्यांना विधानभवनात येऊ द्या त्याशिवाय यांना कळणार नाही अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं होतं. यावरुन मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ‘बिलं नियमितपणे भरली गेली होती. भरली गेलेली बिलं पुन्हा आल्यामुळे बिलं थांबवण्यात आली. यानंतर महापालिकेला यासंबंधी पत्र पाठवण्यात आलं. यादरम्यानच्या काळात महिना, दीड महिना गेला. महापालिकेनेही चूक मान्य करत सुधारणा केलेली बिलं पाठवली. ती भरली गेली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाणीपट्टीवरुन आज विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला असल्याचं पहावयास मिळाले आहे.

COMMENTS