मुख्यमंत्री भेटले नाहीत, तासभर वाट पाहून उद्धव ठाकरे रिकाम्या हाताने परतले !

मुख्यमंत्री भेटले नाहीत, तासभर वाट पाहून उद्धव ठाकरे रिकाम्या हाताने परतले !

मुंबई – मुख्यमंत्र्यांची तासभर वाट पाहून रिकाम्या हातानं परतण्याची वेळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. आमदारांना निधीवाटपाच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये भेट होणार होती. परंतु मुख्यमंत्री विधीमंडळ अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे ही भेटच रद्द झाली असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयाजवळ पोहोचले होते. परंतु मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच रिकाम्या हातानं परतण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मुख्यमंत्र्यांनी पुढील भेटीसाठी वेळही ठरवून दिली असल्याची माहिती आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट न घेतल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपात जुंपण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांशी या मुद्यावर भेट घेऊन चर्चा करणार होते.

COMMENTS