महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तिकीट वाटपात घोळ, पक्ष श्रेष्ठींकडून गंभीर दखल !

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तिकीट वाटपात घोळ, पक्ष श्रेष्ठींकडून गंभीर दखल !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या तिकीट वाटपात घोळ झाला असल्याचं समोर आलं आहे. या घोळाची काँग्रेस श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून घोळ निस्तारण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीहून तीन महत्त्वाचे नेते उद्या मुंबईत दाखल होणार आहेत.संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल, राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री हे मुंबईत येणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तिकीट वाटप आणि इतर विषयावरून घोळ झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील स्थिती सावरण्यासाठी आणि पडझड रोखण्यासाठी काँग्रेसची धावपळ सुरु झाली आहे. त्यासाठी राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांशी वरिष्ठ नेते चर्चा करणार आहेत.  त्यामुळे या नेत्यांच्या दौ-यादरम्यान काय तोडगा काढला जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS