काँग्रेसच्या ‘या’ एकमेव उमेदवाराचा विजय, भाजपच्या दिग्गज नेत्याचा केला पराभव !

काँग्रेसच्या ‘या’ एकमेव उमेदवाराचा विजय, भाजपच्या दिग्गज नेत्याचा केला पराभव !

मुंबई – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीला मोठं अपयश मिळालं आहे. भाजपनं जोरदार मुसंडी मारत 350 च्यावर जागांवर आतापर्यंत विजय मिळवला आहे. काँग्रेस 86 तर इतर 105ट राज्यात तर काँग्रेसच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. याठिकाणी काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचा विजय झाला आहे. चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचा 44763मतांनी विजय झाला आहे. धानोरकर यांनी चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरेश धानोरकर हे एकमेव काँग्रेसचे खासदार आहेत.

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना 514744 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांना 559507 मते मिळाली आहेत. एकूण झालेल्या मतदानामध्ये अहीर यांना ४१.५६ तर सुरेश धानोरकर यांना 45.18 टक्के मे मिळाली आहेत.२००४ नंतर प्रथमच येथे काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर पराभवामुळे भाजपात नैराश्याचे वातावरण आहे.

दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या अशोक चव्हाण यांना नांदेडमधून पराभव पहावा लागला आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात काँग्रेसमध्ये निराशा पहायला मिळत आहे.

COMMENTS