ब्रेकिंग न्यूज – काँग्रेसने सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावले !

ब्रेकिंग न्यूज – काँग्रेसने सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावले !

मुंबई – सत्तास्थापनावरुन मुंबईतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. कारण आतापर्यंत शांत असलेल्या काँग्रेसच्या गोटातही आता हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्या विधानसभेची आणि सरकारची मुदत संपत आहे. पुढील निर्णय घ्यायला सोपं जावं म्हणून काँग्रेसने आमदारांना मुंबईत बोलावलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजपकडूनही आमदारांना संपर्क केला जात असल्याचा संशय असल्यानेही काँग्रेसने आमदारांना मुंबईत बोलावलं असल्याची चर्चा आहे. तसेच राज्यातील सत्तास्थापनावरुन मुंबईत काँग्रेस आमदारांची उद्या बैठक होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना तातडीने मुंबईत बोलावलं असून उद्या मुंबईत पोहचण्याच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS