अखेर सांगलीचा तिढा सुटला, काँग्रेसनं घेतला ‘हा’ निर्णय !

अखेर सांगलीचा तिढा सुटला, काँग्रेसनं घेतला ‘हा’ निर्णय !

मुंबई – सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून काँग्रेसनं ही जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. गेली काही दिवसांपासून या जागेवरुन आघाडीमध्ये तिढा सुरु होता. राजू शेट्टी हे या जागेसाठी अडून बसले होते. यासाठी शेट्टी यांनी दोन वेळा काँग्रेसला अल्टीमेटमही दिला होता. परंतु आज अखेर काँग्रेसनं सांगली लोकसभेच्या निवडणूक रिंगणा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली आहे.

दरम्यान काँग्रेसच्या निर्णयानंतर खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्हाला दोन जागा मिळाल्या असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. सांगली आमच्या वाट्याला आली असून येत्या दोन दिवसात सांगलीचा उमेदवार जाहीर करणार असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS