… नाहीतर शिवाजी महाराज हे संघाचेच म्हणून संघवाल्यांनी सांगितले असते – धनंजय मुंडे

… नाहीतर शिवाजी महाराज हे संघाचेच म्हणून संघवाल्यांनी सांगितले असते – धनंजय मुंडे

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी याठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा पोहचली असून याठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. सोळाव्या शतकात संघ नव्हता म्हणून बर झालं, नाहीतर शिवाजी महाराज हे संघाचेच म्हणून संघवाल्यांनी सांगितले असते असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला कालपासून सुरुवात झाली असून ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी याठिकाणी आज पोहचली आहे. यादरम्यान धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. २०१४ साली भाजप जाहिरातबाजी करून आणि खोटे बोलून सरकारवर आले. देशात महागाई वाढली असे दाखवले जात होते. आज काय परिस्थिती आहे? पेट्रोल, डिझेल, सिलेंडरचे भाव वाढवले असल्याचा आपल्याला पत्ता सुद्धा लागू दिला नसल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS