हे मंत्रालय आहे की सर्कशीचा फड –धनंजय मुंडे

हे मंत्रालय आहे की सर्कशीचा फड –धनंजय मुंडे

मुंबई – मंत्रालयातील वाढत्या आत्महत्येंचं प्रकरण पाहता सरकारकडून आता खबरदारी घेतली जात आहे. यासाठी मंत्रालयामध्ये आज जाळी लावण्यात आली आहे. कोणी आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्याला संरक्षण मिळावं यासाठी ही जाळी लावण्यात आली आहे. परंतु मंत्रालयात लावलेल्या या जाळीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली असून हे मंत्रालय आहे की सर्कशीचा फड? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

https://twitter.com/dhananjay_munde/status/963004298123624449

मंत्रालयात लावलेल्या या जाळीमुळे मंत्रालयाचं चित्र बदललं असल्याचं दिसत आहे. परंतु या जाळीमुळे आत्महत्यांना आळा बसणार का असा सवाल आता केला जात आहे.

 

COMMENTS