गुगलकडून आधारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न – केंद्र सरकार

गुगलकडून आधारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न – केंद्र सरकार

मुंबई – आधारमुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड हे व्यावसायिक स्पर्धेतून बाहेर पडतील त्यामुळे त्यांनी आधारबाबत अपप्रचार सुरू केला असल्याचा आरोप केंद्र सरकारनं केला आहे. आधारची माहिती सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केली आहे. यूआयडीएआयने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयासमोर आधार कार्ड संबंधित प्रकरणावर हा आरोप केला आहे. आधार हे ओळख पटवण्यासाठी एक सुलभ माध्यम म्हणून समोर येत असल्याचंही मत सरकारनं म्हटलं आहे.

दरम्यान युरोपमधील एका व्यावसायिक कंपनीने आधार कार्डचा वापर स्मार्ट कार्डप्रमाणे केला जाऊ नये म्हणून एक अभियान सुरू केलं आहे. जर आधार यशस्वी झाले तर स्मार्ट कार्ड व्यवसायातून बाहेर होईल. त्यामुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड लॉबीला आधार यशस्वी करायचे नसल्याचं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं वरिष्ठ अधिवक्ता राकेश द्विवेदी यांनी म्हटलं आहे. तसेच बायोमेट्रिक डेटा कोणाबरोबरही शेअर केला जात नाही. ज्याचे आधार आहे, त्याच्या सहमतीशिवाय ही माहिती दिली जाऊ शकत नाही. आम्ही डेटा लीक होणार नाही यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. पण याची १०० टक्के खात्री देता येणार नाही. परंतु, याला फेसबुक लीक प्रकरणाशी जोडले जाऊ नये, असही त्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS