थकीत वीज बिलापोटी ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित न करण्‍याचे निर्देश !

थकीत वीज बिलापोटी ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित न करण्‍याचे निर्देश !

मुंबई – वीज थकीत असल्‍यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्‍यात येवू नये असे निर्देश शासनस्‍तरावरून महावितरणला देण्‍यात आले आहेत. चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेल्‍या मागणीच्‍या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.ग्रामपंचायतींच्‍या देयकांचे प्रदान करण्‍यास अनेक ग्रामपंचायती असमर्थ असल्‍यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित करण्‍यात येत होता. यामुळे ग्रामस्‍थांना होणारा त्रास लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने वीज देयके भरण्‍याचा निर्णय मागे घेण्‍याची विनंती चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली होती.

दरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागणीची तातडीने दखल घेत ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याशी चर्चा केली.  त्‍यानुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्‍यात येवू नये अशा सूचना शासन स्‍तरावरून महावितरणला देण्‍यात आल्‍या आहेत. आता ग्रामपंचायतींच्‍या वीज देयकांमधील ठरावीक आर्थीक भार शासन उचलणार असून यासंदर्भात लवकरच योग्‍य निर्णय घेण्‍यात येणार आहे.

 

COMMENTS