वाजपेयींच्या निधनावर पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केला शोक !

वाजपेयींच्या निधनावर पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केला शोक !

नवी दिल्ली – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये थेट लाहोरची बस यात्रा केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली असून ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच वाजपेयींचा खरा सन्मान ठरेल, असं इम्रान खान यांनी म्हटले आहे.

दरम्यान भारत- पाकिस्तानमध्ये राजकीय मतभेद आहेत. परंतु दोन्ही देशांना सीमेवर शांतता हवी आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करणे हीच वाजपेयींसाठी खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तसेसच अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय उपखंडातील आदरणीय नेते होते. भारत- पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि यासाठी ते सदैव स्मरणात राहतील असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS