आम्ही महाराष्ट्रात ‘मनु’चा पुनर्जन्म होऊ देणार नाही: आ.जितेंद्र आव्हाड

आम्ही महाराष्ट्रात ‘मनु’चा पुनर्जन्म होऊ देणार नाही: आ.जितेंद्र आव्हाड

मुंबई- आम्ही महाराष्ट्रात परत ‘मनु’चा पुनर्जन्म होऊ देणार नाही अस वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय त्यात त्यांनी भिडे गुरुजींवर आणि त्यांच्या समर्थकांवर जोरदार टीका केली आहे.

भिडे गुरुजी हे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पेक्षा मनु हे एक पाउल पुढे होते. याच वक्तव्याच समाज माध्यमातून जोरदार विरोध सुरु झाला आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भिडे गुरुजींवर आपली तोफ डागली. स्त्री हि उपभोगाची वस्तू आहे अस म्हणणारा मनु इथली जात व्यवस्था घट्ट करणारा मनु हा संत तुकराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षा श्रेष्ठ कसा काय असू शकत? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला. भिडे गुरुजी हे वारंवार मनुच समर्थन करताना दिसतायेत. अस घाणेरड इतिहास सांगणार्या व्यक्तीला इथले लोक गुरु मानतात त्याचं समर्थन करतात इथली सरकार भिडेंवर गुन्हा दाखल करायला कचरतय हे दुर्दैवास्पद आहे.महाराष्ट्राला हे घाणेरड इतिहास सांगणाऱ्यापासून सावध राहःयला पाहिजे, महाराष्ट्राला हे परवडणार नाही. ज्या बाबासाहेबांनी १९२७ साली मनुस्मृती जाळून टाकली ते बाबासाहेब आमचे आदर्श आहेत.संत परंपरेच्या मार्गाने आम्ही जातोय, तुम्ही कितीही आम्हाला सांगितल तरी आम्ही परत महाराष्ट्रात मनुच पुनर्जन्म होऊ देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.

COMMENTS