मोदींविषयीच्या वक्तव्याने अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा चर्चेत !

मोदींविषयीच्या वक्तव्याने अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा चर्चेत !

मुंबई – कंगना राणावत आणि वाद हे बॉलिवूडमध्ये नवं नाही. अभिनेता ऋतिक रोशन याच्याशी तिचा झालेला वाद मोठ्या प्रमामाणात चर्चेत होता. अधूनमधून तो पुन्हा चर्चेत असतोच. कोणत्या न कोणत्या कारणाने कंपना माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत असते. आता मोदींविषयी केलेल्या वक्तव्यावरुन कंगना पुन्हा चर्चेत आली आहे. नरेंद्र मोदी हे अत्यंत योग्य उमेदवार असून लोकशाहीमधील चांगले नेते आहेत असं कंपना म्हणते. ते त्यांच्या पूर्वजांच्या पुण्याईने नव्हे तर स्वकष्टाने पुढे आले आहेत असंही कंगना राणावत हिने म्हटले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष मोदीच सत्तेवर यावेत असंही तिला वाटतंय.

नरेंद्र मोदी पुन्हा पाच वर्ष सत्तेवर आले तर देशात विकासाचा वेग कायम राहिलं असंही कंगना म्हणते. यावर आता काय राजकीय प्रतिक्रिया येतात  ते पहावं लागेल. कंगनाच्या या वक्तव्याचा मोदींना कितपत फायदा होतो ते पाहण्यासाठी आपल्यला काही काळ वाट पहावी लागेल.

COMMENTS