विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून  ‘यांना’ उमेदवारी निश्चित ?

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘यांना’ उमेदवारी निश्चित ?

औरंगाबाद –  औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजू वैद्य यांचे नाव आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी दानवे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना पक्षाने दिल्या असल्याची माहिती आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर खोतकर यांना पक्षाकडून औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमदेवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून त्यांचे नाव निश्चित समजले जात होते. मात्र ऐनवेळी आता अंबादास दानवे यांचे नाव पुढे आल्याने खोतकर यांचा पत्ता कट झाला असल्याचं दिसत आहे.

औरंगाबाद-जालना या मतदारसंघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत २९ आॅगस्टला संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ आॅगस्ट असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ५ आॅगस्ट आहे. 19 ऑगस्टरोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी २२ आॅगस्ट रोजी होणार आहे.

COMMENTS