“आप सरदार भी हैं और असरदार भी हैं !”

“आप सरदार भी हैं और असरदार भी हैं !”

नवी दिल्ली – काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून यादरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मितभाषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंग यांनी काश्मीर प्रश्नापासून ते अर्थव्यवस्थेवर सडेतोड भाष्य केलं आहे. ‘मोदी सरकारनं लोकांचा विश्वासघात केला असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश केला आहे,’ असा घणाघात मनमोहन सिंग यांनी केला आहे. त्यांनी मोदी सरकारवर केलेल्या सडेतोड टीकेनंतर काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी ‘आप सरदार भी हैं और असरदार भी हैं’, असं म्हणत जोरदार फटकेबाजी केली आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना सिद्धू यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनमोहन सिंग यांनी मौन राहून जे करून दाखवलं, ते भाजपला भपका दाखवून करता आलं नाही अशी जोरदार टीका नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली आहे. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेसलाच बहूमत मिळणार असून राहुल गांधीच पंतप्रधान होणार आहे. तसेत पुढच्या वर्षी राहुल गांधीच लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणार असल्याचंही नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS