आत्महत्त्या रोखण्यासाठी मराठा संवाद यात्रेचं आयोजन !

आत्महत्त्या रोखण्यासाठी मराठा संवाद यात्रेचं आयोजन !

मुंबई – राज्यभरात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यातूनच ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं आहे.तसेच अनेकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्त्येचा पर्याय निवडला या पार्श्वभूमीवर बारामती ते मुंबई अशी मराठा संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्यासह सामाजिक एकोपा रहावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

दरम्यान बारामतीतील नाना सातव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मराठा संवाद यात्रा’ या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. ही यात्रा बारामतीत सुरु होऊन मुंबईत संपणार आहे. या यात्रेदरम्यान वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजात जनजागृती केली जाणार आहे. मराठा समाजानं आजवर काढलेले सर्वच मोर्चे शांततेच्या मार्गानेच पार पडले. मात्र त्याला काही समाजविघातक प्रवृत्तीनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापुढील काळात समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी व सलोखा कायम राहावा यासाठी सर्वच घटकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने संवाद रथाच्या माध्यमातून 5 ते 9 ऑगस्टदरम्यान बारामती ते मुंबई अशी मराठा संवाद यात्रा आयोजित केली जाणार असल्याचं नाना सातव यांनी म्हटलं आहे.

COMMENTS