मनसेचे नवे तीन शिलेदार, ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंनी केली घोषणा !

मनसेचे नवे तीन शिलेदार, ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंनी केली घोषणा !

ठाणे – ठाण्यातील सभा संपता संपता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील तीन शिलेदारांकडे नवी जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये अभिजित पानसे आणि राजू पाटील यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलन करणारे अविनाश जाधव यांची मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राजू पाटील हे मनसेचे कल्याणमधील नेते आहेत. माजी आमदार रमेश रतन पाटील यांचे ते बंधू आहेत. तर अभिजित पानसे हे शिवसेनेतून मनसेत आले आहेत. या नव्या नेमणुकांचा मनसेला किती फायदा होतो हे येत्या काळात दिसून येईलच.

COMMENTS