विधानसभेसाठी मनसेची रणनिती, राज ठाकरेंनी केला ‘हा’ निर्धार !

विधानसभेसाठी मनसेची रणनिती, राज ठाकरेंनी केला ‘हा’ निर्धार !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या मैदानात न उतरताही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक स्वत:च्या राजकीय नेतृत्वाभोवती केंद्रीत करण्यात यश मिळवले. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी विधानसभेत ताकदीने ‘मनसे फॅक्‍टर’ची बांधणी करण्याचा निर्धार केला आहे.
यासाठी त्यांनी दुष्काळी दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत सरकारी उपाययोजनांची पोलखोल करण्यात येणार आहे.

तसेच या दौऱ्यात राज ठाकरे राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नवा आत्मविश्‍वास देण्याचा प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर राज्यातील नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत संधी देण्यासाठीही त्यांनी पसंती दिली असल्याचं बोललं जात आहे.

२०१४ च्या लोकसभा व विधानसभेत मनसेला पराभवाचा दणका बसला होता; मात्र यावेळच्या लोकसभेत प्रचाराचा नवा फंडा वापरत राज यांनी निवडणुकीच्या रणांगणात उसळी घेतली आहे. त्यामुळे आता मोठ्या ताकदीने विधानसेभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय रीज यांनी घेतला आहे.

COMMENTS