“मोदीमुक्त भारत करण्याआधी त्यांनी उभा महाराष्ट्र मनसेमुक्त केला !”

“मोदीमुक्त भारत करण्याआधी त्यांनी उभा महाराष्ट्र मनसेमुक्त केला !”

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यावेळी राज यांनी मोदीमुक्त भारत करण्याचं आवाहन जनतेला केलं परंतु राज यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. मोदीमुक्त भारत करण्याआधी उभा महाराष्ट्र त्यांनी स्वतःच मनसेमुक्त केला असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच पराभूत मानसिकतेतून केलेली ही केविलवाणी धडपड असून मोदीमोक्त भारत करण्यासाठी यांच्याकडे नेते कोण आहेत. यांचे नेते गल्लीपुरते मर्यादित असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान ज्यांनी नगरसेवक पळवले त्यांच्यावर टीका नाही पण भारत मोदी मुक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय असा टोलाही आमदार भातखळकर यांनी लगावला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याची शक्ती या जगात अस्तित्वात येऊ शकत नाही. ही जुनी तबकडी अनेकदा उगाळून झाली आहे असंही अतुल भातखळकर यांनी राज ठाकरे यांना म्हटलं आहे.

COMMENTS