“मनसेचं राजकीय दुकान बंद झालं आहे, त्यामुळेच हल्ला”

“मनसेचं राजकीय दुकान बंद झालं आहे, त्यामुळेच हल्ला”

मुंबई – मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर काल मनसेकडून झालेल्या हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी 24 तास उलटले तरी साधा निषेधही केला नाही. यावरुन मनसे आणि भाजप यांच्यात सेटिंग असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेनेत वाद आहे. त्यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मनसेला फूस मिळत असल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी केला आहे.

मनसेचे राजकीय दुकान बंद झाले आहे. त्यामुळेच मनसेकडून असे हल्ले होत आहेत. लोकशाहीत असे चालत नाही. त्यामुळे मतदारच मनसेचा बंदोबस्त करतील अशी टीकाही निरुपम यांनी केली. निरुपम यांनी आज कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. मनसे माझ्या अंगावर आली आहे. त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करु असंही निरुपम यांनी सांगितले.

COMMENTS