15 लाख नाही तर किमान 15 हजार तरी द्या – मोहन प्रकाश यांचा सरकारला चिमटा

15 लाख नाही तर किमान 15 हजार तरी द्या – मोहन प्रकाश यांचा सरकारला चिमटा

उस्मानाबाद – नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांनी 15 लाख तर सोडाच पण किमान 15 हजार रुपये तरी द्यावेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे. उस्मानाबादमध्ये काँग्रेसचा जनअक्रोश सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मोहन प्रकाश यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. बँकांचा एनपीए वाढत असून मुठभर उद्योजकांसाठी हा सर्व खटाटोप असून नोटाबंदीमुळे महिलांकडील पैसा सरकारने काढून घेतला आहे. काळा पैसा आणू म्हणणाने दोन दाढीवाले कुठे आहेत. काळा पैसाही दिसत नसून याच नेत्यांना त्यांचा पाढरा पैसा केल्याची टीकाही यावेळी मोहन प्रकाश यांनी केली.

COMMENTS