काँग्रेसमधील काही नेत्यांनीच राहुल गांधींची बदनामी केली – कुमार केतकर

काँग्रेसमधील काही नेत्यांनीच राहुल गांधींची बदनामी केली – कुमार केतकर

मुंबई – काँग्रेसमधील काही नेत्यांमुळे राहुल गांधी यांची बदनामी झाली असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. एबीपी माझातील माझा कट्ट्यात बोलत असताना केतकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. काँग्रेसमधील काही नेतेच राहुल गांधी यांच्या विरोधात होते. त्याच लोकांनी राहुल गांधींची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं केतकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ‘2019 साली नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचं खूपच वाटोळं होईल असंही केतकर यांनी म्हटलं आहे. ‘2013  सालीच मी मत मांडलं होतं की, मोदी पंतप्रधान झाले तर देशाचं वाटोळं होईल. आता मला असं वाटतं की, 2019 साली मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचं आणखी वाटोळं होईल. आताही देशाचं खूपच वाटोळं म्हणजे खूपच वाटोळं झालं आहे. त्यांचं कारण म्हणजे  मला कधीही वाटलं नव्हतं की, बीफ, लव्ह जिहाद यासारख्या विषयांवर कधी एवढी चर्चा होईल. पण मोदी सरकार आल्यानंतर या विषयांवर चर्चा सुरु झाली. त्यामुळे देशातील वातावरण बिघडलं असल्याची कुमार केतकर यांनी केली आहे.

COMMENTS