ब्रेकिंग न्यूज – मुंबई हायकोर्टाचा फेरीवाल्यांना दणका !

ब्रेकिंग न्यूज – मुंबई हायकोर्टाचा फेरीवाल्यांना दणका !

मुंबई – मुंबईसह परिसरात सध्या सुरू असलेल्या फेरीवाल्यांच्या राजकारणात हायकोर्टानं फेरीवाल्यांना दणका दिला आहे. रेल्वे स्टेशन, शैक्षणिक संस्था, धार्मिक ठिकाणे या परिसरात दुकाने थाटण्यास मनाई करण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी 150 मीटरच्या बाहेर दुकाने थाटावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन सध्या जोरात राजकारण सुरू आहे. काँग्रेस विरुद्ध मनसे यांच्यात यावरुन मुद्द्याची लढाई गुद्द्यांवर आली आहे. आता कोर्टाच्या या निर्णयामुळे राजकारण्यांनाही फटका बसला आहे.

COMMENTS