कोल्हापूर महापालिकेची वीज एका तासासाठी तोडली !

कोल्हापूर महापालिकेची वीज एका तासासाठी तोडली !

कोल्हापूर – कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखले नाही म्हणून शिवसेना आक्रमक झाली असल्याचं गुरुवारी पहावयास मिळालं आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी महापालिकेची वीज तोडली असल्याची माहिती मिळत आहे. शिवसैनिकांनी एका तासासाठी महापालिकेची वीज तोडली होती. त्यामुळे महापालिकेवर मोठी नामुष्की आली होती.

दरम्यान आक्रमक  झालेल्या शिवसैनिकांनी महानगरपालिकेची वीज तोडायला महावितरण कंपनीला भाग पाडलं होतं. एक तास ही वीज तोडल्यामुळे महापालिकेत अंधार पहावयास मिळाला आहे. एका तासासाठी महापालिकेची अनेक कामं ठप्प झाली होती. त्यामुळे  पंचगंगा नदीचे प्रदूषण लवकरात लवकर रोखले नाही तर महापालिकेची वीज कायमस्वरुपी बंद करण्याचा इशारा प्रदूषण मंडळ आणि शिवसैनिकांनी दिला आहे.

COMMENTS