नाना पटोले आणि राजू शेट्टी यांची दिल्लीत भेट; खा. पटोलेंचा सरकार, महसूलमंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल !

नाना पटोले आणि राजू शेट्टी यांची दिल्लीत भेट; खा. पटोलेंचा सरकार, महसूलमंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल !

नवी दिल्ली – दिल्लीत आज भाजप खासदार नाना पटोले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खा. राजू शेट्टी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी मागील काही दिवसांपासून मोदी आणि राज्य सरकार विरोधात टीका सुरू केली आहे.  यावेळी त्यांनी एकमेकांना मिठी मारली.

भाजप खा. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लुटारु मद्य सम्राट विजय माल्या देशातून पळून जातो, मात्र शेतकरी मात्र अडकतोय. हे सरकारचे सोंग आहे. हे सरकारचे महापाप आहे, असा जोरदार हल्लाबोल नाना पटोले यांनी केलाय. गडचिरोलीमधील लाॅईड कंपनीला सुरक्षा का दिली ?, असा सवाल उपस्थित केला. २३ किमी पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्यासाठी लाॅईड कंपनीकडून पैसे घेतले जात नाही. त्याचवेळी राजकीय नेत्यांचे कंपनीशी लागेबंध आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. या लागेबांधामुळे कंपनीला पोलिसांडून संरक्षण दिले जात आहे. दरम्यान, सुकमा घटनेनंतर सरकारने सुधारणा केलेली नाही, असे ते म्हणालेत.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, अशी टीका त्यांनी केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून २ लाख ११ हजारे एनपीए झाले आहेत. मात्र, लुटारू विजय माल्या पळून जातो आणि शेतकरी मात्र कर्जाच्या जाळ्यात अडकतोय. असेही ते म्हणालेत. भाजप आता खा. नाना पटोले त्यांच्या यांच्या आरोपांना उत्तर देणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

COMMENTS