नक्षलवाद्यांनी का केली आमदारांची हत्या ? कसा घडवला हल्ला ?

नक्षलवाद्यांनी का केली आमदारांची हत्या ? कसा घडवला हल्ला ?

नक्षलवाद्यांनी काल तेलगू देसम पक्षाच्या एका विद्यमान आमदार आणि एका माजी आमदाराची हत्या केली. काल दुपारी डंबरीगुडा या भागात तब्बल 50 नक्षलवद्यांनी ही हत्या केली. डंबरीगुडा हा भाग आदिवासीबहुल आहे. आंध्रप्रदेश आणि ओरिसा या राज्याच्या सिमेवर हा भाग आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांचं मोठं प्राबल्य आहे. काल दुपारी साडेबाराच्या सुमारास हे हत्याकांड घडवण्यात आलं. विद्यमान आमदार किदारी सर्वेस्वर राव आणि माजी आमदार सिव्हेरी सोमा यांची हत्या करण्यात आली आहे.

इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या वृत्तानुसार एका खाणकाम कंत्राटावरुन नक्षली आणि या नेत्यांमध्ये वाद होता. त्याची बोलणी करण्यासाठी हे दोघे नक्षलींकडे गेल्याची माहिती आहे. मात्र तिथे बोलणी फिस्कटली आणि सुमारे 40 ते 50 नक्षलवाद्यांनी त्या दोघांची हत्या केली. दरम्यान ही हत्या झाल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. आमदार समर्थकांनी तिथल्या स्थानिक पोलिस स्टेशनला आग लावली आहे. दरम्यान या हल्ल्या प्रकरणी आंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसफ, एसओजी आणि सीरपीफ यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वेश्वरा राव यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. किदारी सर्वेश्वरा राव हे वायएसआर काँग्रेसच्या तिकीटावर अराकूमधुन आमदारकीची निवडणूक जिंकले होते. नंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान जे नक्षलींच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांनी नक्षली भागात जाताना पोलिसांना सांगावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र दोघांनीही याबाबत काहीही माहिती दिली नव्हती असं पोलीस अधिक्षक राहुल देव शर्मा यांनी सांगितलं आहे.

COMMENTS